काँग्रेसने तर बाबासाहेबांना भारतरत्न देखील दिले न्हवते म्हणत देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर निशाणा.
News published by news24tas
संसदेत अमित शाह यांच्या झालेल्या भाषणामुळे संपूर्ण देशभरात आंबेडकरवादी जनतेने अमित शाह यांच्या विरोधात आंदोलन करत निषेध व्यक्त केला एकवढेच काय तर संसदेत देखील या विषयावरून मोठा गदारोळ झाला होता. परंतु यावर बोलताना आता देवेंद्र फडणवीस म्हणाले की खरा विरोध तर आरक्षणाला काँग्रेसचा च आहे अगदी नेहरूजी पासून तर इंद्रा गांधी व संपूर्ण गांधी परिवाराचा संविधानाला व बाबासाहेबांच्या विचारांना विरोधच राहिलेला आहे हीच बाब जेव्हा मोदीजींनी संपूर्ण जगासमोर आणली तेव्हा काँगेस पक्ष नाटक करून जनतेची दिशाभूल करत आहे. खरे तर काँगेस पक्षाने कधीच डॉ. बाबासाहेबांना निवडून येऊ दिले नाही जाणीवपूर्वक त्यांना पाडले आणि एवढेच काय तर ज्या ठिकाणी बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले त्या इंदू मिलच्या जागेवर स्मारक व्हावे यासाठी अनेक वर्ष आंदोलने करून देखील काँग्रेस ने एक इंच जागा देखील तिथे दिली नाही. बाबासाहेबांना भारतरत्न देखील काँगेस सरकार असताना कधी दिले गेले नाही असे देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.
डॉ. बाबासाहेबांना भारतरत्न केव्हा देण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
मृत्यूनंतर तब्बल 33 वर्षांनी भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. तत्कालीन पंतप्रधान व्ही.पी. सिंग यांच्या सरकारनं हा पुरस्कार देण्याचं 31 मार्च 1990 घोषित केलं.
छेड-काढणाऱ्या-पठाण-विरोधात मनसे मैदानात वाचा संपूर्ण.
