जालन्यात भटक्या कुत्र्यांमुळे चिमुकलीचा मृत्यू.

गांधी नगर परिसरात राहणाऱ्या पाटोळे कुटुंबावर पालिकेच्या हलगर्जीपणामुळे दुःखाचा डोंगर कोसळला.

News published by News24tas

जालना:– शहरात दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांची संख्या वाढतच चालली असून पालिका प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी आता नागरिक करत आहेत.आज सकाळी गांधीनगर भागातील एका चिमुकलीचा कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात हकनाक बळी गेला आहे. परिसरात वाढलेली घाण व कचरा यामुळे अनेक भटक्या कुत्र्यांचा वावर या परिसरात वाढला होता. व सदरील मृत चिमुकली सकाळी परिसरात खेळत असतांना तिच्यावर तीन ते चार मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला व यात तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून मृत मुलीचे नाव संध्या पाटोळे असे असून तिचे वय हे अवघे ७ ते ८ वर्षे होते.

वारंवार निदर्शनास आणून देखील कचरा व कुत्र्यांचा प्रश्न मार्गी लागत नाही – रवि राऊत.

जालना महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना वारंवार निदर्शनास आणून देखील ते कचऱ्याच्या व भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर काना डोळा करत आहेत.अनेक वेळा आंदोलने करून देखील प्रशासन याविषयी ठोस पावले उचलून उपाययोजना करत नाही त्यामुळेच आज या चिमुकलीचा बळी गेला असून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी व त्यांच्या परिवाराला योग्य ती मदत द्यावी कारवाई न झाल्यास सर्व कुत्रे पकडून महानगरपालिकेत सोडण्याचा इशारा यावेळी मनसेचे जिल्हा अध्यक्ष रवि राऊत यांनी दिला आहे. यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष शरद मांगधरे, विलास तिकांडे,वैभव साळे, संतोष शेळके, राजू कदम,यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

नातेवाईक व परिसरातील नागरिक जिल्हा रुग्णालयात मोठ्या संखेने उपस्थित!

सदरील प्रकरणाची माहिती गांधी नगर परिसरातील नागरिकांना मिळताच नागरिकांनी व पाटोळे यांच्या नातेवाईकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. विशेष म्हणजे सदरील मुलीचे सख्खे काका हे मनसे पदाधिकारी असून भटक्या कुत्र्यांच्या व कचऱ्याच्या प्रश्नावर त्यांनी आंदोलन करत १५ दिवसांची पोलिस कोठडी देखील भोगलेली आहे.

विष्णू पाचफुले यांच्या प्रयत्नाला यश. आयुक्तांचे घरकुल भरण्याचे आदेश.

जालन्यात धक्कादायक प्रकार उघडकीस! माणुसकीला काळिंबा फासणारी घटना उघडकी

पंतप्रधान पदासाठी फडणविसांचे नाव चर्चेत.

जालन्याची बीडकडे वाटचाल ! वाळू माफियांच्या भाईगिरीला आळा घालावा – रवि राऊत.

वैभवीने करून दाखवले बारावीच्या परीक्षेत मिळाले घवघवीत यश.

पावसाळा चालू होण्या आधीच अनेक ठिकाणी तळे! पावसाळ्यात जालन्याचे काय होणार!

 

 

 

news24tas
Author: news24tas

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संबंधित बातम्या