पावसाळा चालू होण्या आधीच अनेक ठिकाणी तळे! पावसाळ्यात जालन्याचे काय होणार!

जालन्यात पाणीच पाणी चोहीकडे…!

News published by News24tas

जालना:- शहरात अनेक ठिकाणी आज मुसळधार पाऊस पडला असून काही ठिकाणी गारा देखील पडल्या आहेत. या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे आंबा,कांदे व पालेभाज्या यांसह अनेक पिकांचे नुकसान देखील झाले.ग्रामीण भागासह शहरात देखील गारा पडल्यामुळे व अचानकपणे कडक ऊन असताना आलेल्या पावसामुळे अनेकांची चांगलीच धावपळ यामुळे झाली. या अवकाळी आलेल्या २ तासाच्या पावसामुळे महावितरणासह पालिकेचा भोंगळ कारभार उघडा पडला आहे. शहरात अनेक ठिकाणी तारा तुटल्या तर अनेक ठिकाणी पाण्यामुळे रस्त्यात तळे साचले. अवघ्या १ महिन्यावर आलेल्या पावसाळी ऋतूत देखील अशाच प्रकारे जर प्रशासनाचा नियोजन शून्य कारभार राहिला तर जालनेकरांची मोठी तारांबळ दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील होईल यात काही शंका नाही.

जालन्यातील शनि मंदिर ते गांधी चमन रस्त्यावरील साचणाऱ्या पाण्याचा प्रश्न कधी सुटणार ?

जालना शहरातील मुख्य रस्त्यांपैकी एक मुख्य रस्ता म्हणजे शनि मंदिर ते गांधी चमन हा रस्ता,येथे नेहमीच नागरिकांची ये जा मोठ्या प्रमाणात असते. गेल्या कित्येक वर्षापासून येथील एक मुख्य समस्या म्हणजे थोडा जरी पाऊस पडला की येथील पावसाचे व नाल्याचे पाणी एकत्र होऊन रस्त्यावर साचते.त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात घाणीचे साम्राज्य पसरते व येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना जाताना मोठा त्रास सहन करावा लागतो. अनेक वेळा इथे जास्त प्रमाण पाणी साचल्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात देखील होतात. जवळच सरस्वती भुवन माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचा वावर देखील या रस्त्यावरून असतो तरी देखील मागील कित्येक वर्षापासून या प्रश्नाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.नवीन रस्ते झाले मात्र ड्रेनेज चे व्यवस्थित नियोजन नसल्या कारणाने कित्येक वर्षापासून येथे तोच प्रश्न उद्भवत आहे.त्यामुळे प्रशासनाने यावर्षी तरी पावसाळ्यापूर्वी सदरील प्रश्न मार्गी लावावा हीच अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

गांधी नगर येथे देखील पाणी साचल्याने नागरिकांना येण्या – जाण्यासाठी होतोय त्रास.

शहरातील गांधीनगर परिसरात देखील असाच प्रश्न उद्भवत असून नाले सफाई साठी परिसरातील नागरिकांनी मागणी करून देखील प्रशासनाने दुर्लक्ष केले व गांधी नगर परिसरात रस्त्यात पाणी साचल्याने नागरिकांना येण्या जाण्यासाठी त्रास सहन करा लागला.

जालन्यात धक्कादायक प्रकार उघडकीस! माणुसकीला काळिंबा फासणारी घटना उघडकी

जालन्याची बीडकडे वाटचाल ! वाळू माफियांच्या भाईगिरीला आळा घालावा – रवि राऊत.

वैभवीने करून दाखवले बारावीच्या परीक्षेत मिळाले घवघवीत यश.

news24tas
Author: news24tas

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संबंधित बातम्या