भारतीय सैन्याने रात्री १:४४ मिनिटांच्या सुमारास केला पाकिस्तानवर हल्ला.
News published by News24tas
दिली:- काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या काही दहशतवाद्यांनी भारतातील काश्मीर येथे फिरायला गेलेल्या भारतीय नागरीकांना त्यांचा धर्म विचारून त्यांचा जीव घेतला. व या दहशतवादी हल्ल्यात तब्बल २६ नागरिकांचा हकनाक बळी यात गेला. त्यानंतर सर्वत्रच भारताने पाकिस्तानवर हल्ला करावी अशी मागणी जोर धरु लागली होती पण केंद्रातील सरकार फक्त बैठकांवर बैठका घेत होते त्यामुळे पाकिस्तान सह देशातील नागरिकांनी देखील यावेळी भारत बदला घेणार नाही असा गैरसमज बांधला आणि झाले उलटेच इकडे सर्व भारतात मॉक ड्रिल च्या चाचण्या मोदी सरकारने घ्यायचा आदेश काढला व मॉक ड्रिल होण्या अगोदरच भारतीय सैन्याने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करत रात्री १:४४ च्या सुमारास हल्ला केला. पाकिस्तानवर भारताने तीन ठिकाणी हल्ला केला असल्याचे पाकिस्तानी लष्कराने म्हणले. बहावलपूर, कोटली व मुज्जफराबाद या तीन ठिकाणी हल्ला झाल्याची माहिती पाकिस्तानी लष्कराने दिली आहे. तर याउलट पाकिस्तानी पंतप्रधान म्हणले आहे की हल्ला हा ५ ठिकाणी झाला आहे त्यामुळे खरोखर किती ठिकाणी हल्ला करण्यात आला आहे याची माहिती सध्या तरी कोणालाच नसल्याचे बोलले जात आहे.
पाकिस्तान देखील भारतावर हल्ला करू शकतो!
भारतीय लष्कराकडून केल्या एअर स्ट्राईक चा बदला घेण्यासाठी पाकिस्तान देखील भारतावर हल्ला करू शकतो अशी शक्यता आता अनेक जण वर्तवत आहे परंतु याची पुरेपूर तयारी भारताने केली असून सदरील एअर स्ट्राईक देखील पूर्व नियोजित असल्याचे बोलले जात आहे त्यामुळेच जर एअर स्ट्राईक नंतर पाकिस्तानने काही वेगळे पाऊल उचलले तर आधीपासूनच मॉक ड्रिल च्या माध्यमातून सर्व सुरक्षा दल व नागरिक देखील अलर्ट आहेत.
