महाराष्ट्रात पाकिस्तानातून आलेली एकूण १०७ लोकं बेपत्ता! – शिंदे.
News published by News24tas
बुलढाणा:- काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात पाकिस्तान विषयी संतापाची लाट पसरलेली आहे. व सरकारने देखील ऍक्शन घेत भारतात असलेली पाकिस्तानी लोकांना तत्काळ देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्रात देखील एकूण ५०२३ नागरिक वास्तव्यास होते व त्यातील १०७ लोक हे नॉट स्ट्रेसेबल म्हणजेच बेपत्ता असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत त्याच पाकिस्तानी नागरिकांना आता एकनाथ शिंदे यांनी सज्जड दम दिला असून तत्काळ देश सोडून जा असे म्हणले आहे.
दहशतवादी हल्ल्यानंतर एकनाथ शिंदे ऍक्शन मोडवर!
काश्मीर येथे झालेल्या हल्ल्यांची माहिती मिळताच एकनाथ शिंदे अक्टिव झाले असून त्यांनी तेथे अडकलेल्या महाराष्ट्रतील नागरिकांना काश्मीर ते महाराष्ट्र तत्काळ येण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या व आता थेट महाराष्ट्रात बेपत्ता असलेल्या त्या १०७ पाकिस्तानी लोकांना दिसले की ठोकणार असे म्हणले आहे.त्यांनी १ मे अगोदर देश सोडवा अन्यथा पोलिस त्यांचा शोध घेतील व दिसतील तिथेच ठोकतील असे एकनाथ शिंदे म्हणाले.
पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्यासाठी तयारी चालू – फडणवीस
सदरील विषयावर बोलताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची यादी प्राप्त झाली असुन प्रत्येक पोलिस स्टेशनला या संदर्भात सूचना दिली जात आहे. संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवली जात असून लवकरात लवकर जो कोणी अधिक काळ राहत असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.
ठाकरे बंधू एकत्र येणारच! पुन्हा एकदा सेनेकडून टाळीसाठी हात पुढे?
नागपुरात तब्बल २००० पाकिस्तानी आढळले! कठोर कारवाईचे सरकारचे आदेश.
