अचानकपणे त्या नियुक्त्या थांबवण्याचे कारण आले समोर !
News published by News24tas
कोकण:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रत्नागिरी येथील झालेल्या उपजिल्हाध्यक्ष (राजापुर विधानसभा) उपजिल्हाध्यक्ष (रत्नागिरी विधानसभा),तालुका अध्यक्ष (रत्नागिरी) शहर अध्यक्ष (रत्नागिरी),तालुका अध्यक्ष (चिपळूण),शहर अध्यक्ष (चिपळूण) च्या नियुक्त्या तत्काळ थांबवण्याचे आदेश पक्षाने जारी केले परंतु असे अचकपणे केलेल्या पदनियुक्त्या का थांबवल्या यामुळे कार्यकर्ते संभ्रमात असताना पदनियुक्त्या थांबवण्याचे खरे कारण आता समोर आले असून मनसेने सावधपणाची भूमिका घेत सदरील नियुक्त्या थांबवल्या असल्याचे बोलले जात आहे. व त्याला कारण म्हणजे रत्नागिरी खेड चिंचघर येथील कार्यक्रमात शिवसेना नेते रामदास कदम, मंत्री शंभूराजे देसाई, गृहराज्यमंत्री योगेश कदम, पालकमंत्री उदय सामंत, माजी आमदार संजय कदम या सगळ्यांचे उपस्थितीतच थेट वैभव खेडेकर यांना शिवसेनेत येण्याचीऑफर देण्यात आली आहे. या ऑफर नंतर दुसऱ्याच दिवशी रत्नागिरी जिल्ह्यात वैभव खेडेकर यांनी केलेल्या काही मनसे पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तांना थेट स्थगिती देण्यात आल्याने हा विषय चर्चा ठरला आहे.
मनसेला कोकणात मोठा धक्का बसण्याची शक्यता!
वैभव खेडेकर हे राज ठाकरे यांचे कोकणातील महत्त्वाचे शिलेदार आहेत. राज ठाकरे यांनी मनसे स्थापन केल्यापासून ते त्यांच्याबरोबर आहेत इतकंच नाही तर राज्यातील पहिली खेड नगरपरिषद निवडून आणण्यात वैभव खेडेकर यांचा पुढाकार होता ते खेडचे यापूर्वी नगराध्यक्ष राहिले आहेत. धडाडीचा आंदोलनातील थेट भिडणारा कार्यकर्ता अशी त्यांची खास ओळख आहे. यापूर्वी त्यांचा संघर्ष हा थेट त्यांचे राजकीय गुरू शिवसेना नेते रामदास कदम यांच्याबरोबर राहिला आहे पण अलीकडे हा संघर्ष निवळला आहे. युवा वर्गामध्येही वैभव खेडेकर यांची मोठी क्रेझ आहे. वैभव खेडेकर यांच्यावर आता सद्यस्थितीत मनसेच्या राज्यसरचिटणीस पदाची मोठी जबाबदारी आहे त्यामुळे वैभव खेडेकर यांच्या शिवसेनेच्या शिंदे गटातील पक्षप्रवेशाची विषयाची चर्चा सध्या सुरू झाली आहे असं झाल्यास मनसेला मोठा धक्का कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात बसण्याची शक्यता आहे.0
