तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून ठाकरे बंधूंना एकत्र करण्यासाठी शरद पवारांचे प्रयत्न चालू?
News published by News24tas
मुंबई:- गेल्या अनेक वर्षांपासून राज्याचे राजकारण ज्या प्रकारे चालू आहे ते पाहता आता ज्या प्रकारची माहिती समोर येत आहे ती नाकारता येणे शक्य नाही. कारण एके काळी राजकीय विरोधक असलेली काँग्रेस शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन सरकार स्थापन करू शकते तर अनेक घोटाळ्यांचे आरोप ज्यांच्यावर भाजप नेत्यांनी केले त्यांना म्हणजेच अजित पवारांना सोबत घेऊन भाजप त्यांना उपमुख्यमंत्री करू शकते तर राज्याच्या राजकारणात काहीही होऊ शकते हे निश्चित! अनेक दिवसांपासून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का? याबाबत अनेक तर्क वितर्क विविध राजकीय विश्लेषक लावत आहेत. व दोन्ही पक्षाचे नेते “पहिले आप,पहिले आप” करत आहेत. तर दोन्ही पक्षाचे प्रमुख यावर स्पष्टपणे भाष्य करणे टाळत आहेत. परंतु राज ठाकरे व उद्धव ठाकरे दोघेही माध्यमांसमोर काहीही बोलत नसले तरी या दोघांमध्ये युती घडवून आणण्याचे काम खुद्द शरद पवार करणार असल्याची माहिती काही विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
तिसऱ्या आघाडीत कोण कोणते पक्ष असतील?
आगामी महानगर पालिकेच्या निवडणुकीत युती व महाविकास आघाडी व्यतिरिक्त एक नवीन आघाडी उदयास येऊ शकते असे अनेक राजकीय विश्लेषक आता या बद्दल भविष्यवाणी करू लागले आहेत.त्यामुळे आगामी काळात ठाकरे बंधू एकत्र येतील मात्र फक्त दोघेच एकत्र न येता महाराष्ट्राचे प्रदेश पक्ष मिळून ही आघाडी होऊ शकते.यात प्रामुख्याने उद्धव ठाकरेंची शिवसेना,राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शरद पवार यांची राष्ट्रवादी तसेच अनेक छोटे प्रादेशिक पक्ष देखील या आघाडीत सामील होतील. व पालिका निवडणूक या तिसऱ्या आघाडी विरुद्ध महायुती असा होईल तर काँग्रेस पक्ष स्वतंत्र निवडणुका लढवेल अशी चर्चा आता सुरू आहे.त्यातच काही पत्रकारांनी शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यात या विषयावर एक गुप्त बैठक झाल्याचे देखील सांगितले आहे. शरद पवार सध्या एकदम शांत असून सर्व राजकीय हालचालींवर बारकाईने लक्ष ठेऊन आहे व ज्यावेळी शरद पवार अशा प्रकारे शांत असतात त्यावेळी निश्चितच कोणतीतरी मोठी हालचाल ही पडद्यामागून चाकू असते असे अनेक जानकर म्हणतात.त्यामुळे आगामी काळात राज्यात तिसरी आघाडी उदयास येते का ते पाहणे महत्वाचे राहील.
महावितरण कार्यालय गाठत अधीक्षक अभियंत्यावर प्रश्नाचा भडिमार!
अंबानी गडकरींना म्हणाले की, रस्ता बांधण्याची सरकारची औकाद आहे काय?
