विद्यापीठात कुलगुरूंना भेटणे झाले कठीण.
News published by News24tas
जालना:– गेल्या अनेक दिवसांपासून कुठल्या ना कुठल्या कारणामुळे विद्यापीठाचा भोंगळ कारभार समोर येत असून यामुळे अनेक विद्यार्थी त्रस्त आहे. व सदरील विषयांवर गाऱ्हाणी मांडायला विद्यार्थी गेले असता कुलगुरू मीटिंग मध्ये व्यस्त असल्याचे कारण देत एकही अधिकारी तिथे भेट देण्यासाठी उपलब्ध नसल्याचे विद्यार्थी व विद्यार्थी नेत्यांनी दिलेल्या माहितीत म्हणले आहे.यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता त्यांच्या म्हणण्यानुसार विद्यापीठात कुलगुरूंच्या दालनात जातांना एखाद्या केंद्रीय मंत्र्याला जेवढी सुरक्षा नसेल तेवढी सुरक्षा असल्याचे दिसले एवढेच काय तर ५-६ विद्यार्थ्यांना बघताच तेथील सुरक्षा रक्षकांनी थेट गेटला लॉकच केले त्यामुळे आक्रमक विद्यार्थी व सर्व पक्षीय विद्यार्थी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत आठ दिवसात आंदोलनाचा इशाराच दिला आहे.
सर्व पक्षीय विद्यार्थी कृती समितीच्या नेमक्या मागण्या कोणत्या?
इवॅल्यूशनचे फॉर्म भरून तब्बल २ महि ने उलटले आहेत व सेमिस्टर इंड एक्जाम सुद्धा संपलेल्या आहेत परंतु अद्याप हि रि- इॉल्यूशनचा (रि – चेकिंग) निकाल लागलेला नाही व लवकर लागेल असे सुद्धा दिसत नाही विद्यापीठाच्या अशा वागण्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे व विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे. निकाल लागल्यावर विद्यापीठ रि- इवॅल्यूशनच्या फॉर्म भरण्यासाठी फीस घेते व परीक्षा फॉर्म येण्याच्या अगोदर रि- इवॅल्यूशनचा निकाल लावत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा फॉर्म भरावा लागतो व त्यामुळे त्याला परत फीस भरावी लागते सदरील प्रकारामुळे गरीब विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे तरी सदरील विद्यार्थ्यांवर होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी सर्वपक्षीय विद्यार्थी संघर्ष कृती समिती खालील मागण्या करत आहे.
१) रि- इॉल्यूशनचा निकाल येत्या आठवड्याभरात लावण्यात यावा,
२) ज्या विद्यार्थ्यांचे रि- इवॅल्यूशन मध्ये मार्क वाढलेले आहेत सदरील विद्यार्थी विद्यापीठ प्रशासनाच्या चुकीमुळे फेल/ कमी मार्क झालेले आहेत त्या सदरील विद्यार्थ्यांची रि- इवॅल्यूशनची फी त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावी व या नंतरही तशी प्रक्रिया राबविण्यात यावी.
३) विद्यार्थ्यांचे नियमित निकाल ४५ दिवसांच्या आत लावण्यात यावेत व रि- इवॅल्यूशनचा निकाल परीक्षा फॉर्म सुरु करण्याच्या आगोदर लावण्यात यावेत.
४) विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या बहुतांश महाविद्यालयांमध्ये नियमित तासिका होत नाहीत सदरील महाविद्यालयांमध्ये नियमित तासिका घेण्याचे आदेश देण्यात यावेत.
५) ७५% अटेंडन्सचा नियम काटेकोरपने पाळण्याकरिता महाविद्यालयांमध्ये बायोमेट्रिक हजेरी घेण्यात यावीयांसारख्या विविध मागण्यांसाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून निवेदन विद्यापीठात देण्यात आले परंतु कुलगुरू यांची भेट न झाल्याने आवक – जावक विभागात सदरील निवेदन देत पदाधिकाऱ्यांनी यावर तात्काळ कारवाई करण्यात न आल्यास आंदोलनाचा इशारा दिला यावेळी निलेश रत्नपारखी (समन्वयक, सर्वपक्षीय विद्यार्थी कृती समिती.) वैभव साळे (शहर उपअध्यक्ष मनविसे) राहुल हनवते (जिल्हा सचिव स्टूडेंट फेडरेशन ऑफ इंडिया) मुकुंद हिवराळे (सदस्य, सर्वपक्षीय विद्यार्थी संघर्ष कृती समिती) गौरव साळवे (निमंत्रक, सर्वपक्षीय विद्यार्थी संघर्ष कृती समिती) संदेश जाधव (विद्यार्थी नेता) सुशिल देशमुख (विद्यार्थी नेता) व अन्य कार्यकर्त्यांची व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
