लवकरात लवकर पैसे कमावण्याचा नवीन मार्ग !
News published by News24tas
महाराष्ट्र:- आज काल सर्वांनाच लवकरात लवकर पैसे कमवायचे आहेत व आपल्या गरजेच्या वस्तू त्यातून सहजरित्या मिळवायच्या देखील आहेत. व त्यामुळे आपली तरुण पिढी उत्पन्नाचे वेगळेगळे मार्ग शोधत असून काही लोक शेअर मार्केट मधून पैसे कमवतात तर काही उद्योग धंद्यातून तर काही लोक लोकांचे बघून त्यांच्या माध्यमातून पैसे कमवायचे स्वप्ने बघतात आणि याच स्वप्नाला खरे करण्यासाठी काही लोक तुम्हाला २ हजारांचे १२ हजार तेही अवघ्या काही तासात देतो असे सांगतात आणि आपली तरुण मंडळी देखील या भूल थापांना बळी पडून फक्त दोनच हजार आहेत आले तर १२ येतील गेले तर २ जातील म्हणून गुंतवणूक करतात आणि त्या जाळ्यात अडकतात. हल्ली इंस्टाग्राम, टेलिग्राम, फेसबुक व व्हॉट्सअँप वर एक नवीन स्कॅम चालू असून तुम्हाला त्यात अडकवायचे अनेकांचे मनसुबे असतात. परंतु तुम्ही त्याला बळी पडू नका. हे सायबर फ्रॉड तुम्हाला आधी २ हजारांची मागणी करतात किंवा इतर कोणत्याही छोट्या रकमेची मागणी करतात व तुम्हाला त्याचे १० ते १५ हजार देण्याचे आमिष दाखवतात पण तुम्ही जर एकदा त्यांना पैसे सेंड केले तर तुम्हाला ते म्हणतात की सर अजून २ -५ हजार टाका आधीचा तुम्ही निवडलेला प्लॅन संपला आहे. V तुम्ही जर म्हणले की नको मला नवीन प्लॅन माझे मला पैसे परत करा तर ते तुम्हाला परत करत नाहीत आमच्या कंपनीच्या रुल्स मध्ये तसे बसत नाहीत असे सांगत व तुमचे पैसे घेऊन फरार होतात. त्यामुळे असल्या कुठल्याही लालचेला बळी पडू नका.ही लोक तुम्हाला इतर लोकांच्या पेमेंटची स्क्रीन शॉट देखील दाखवतील परंतु ते सर्व काही खोटे असते. त्यामुळे सावधगिरी बाळगा.
जर लवकर पैसे कमावण्याच्या नादात तुम्ही फसले गेला तर काय कराल?
जर चुकून तुम्ही या गुन्हेगारांचे शिकार झालात तर काय करायचं असा प्रश्न अनेकांना पडतो कुठे २-५ हजाराने आपल्याला फरक पडतो. कोण त्या दोन पाच हजारांची तक्रार करत बसणार असे म्हणत अनेक जण काहीच करत नाहीत.त्यामुळे या गुन्हेगारांना प्रोत्साहन मिळते व अन्य लोकांना ते शिकार बनवतात जर तुमच्या सोबत असे काही घडले तर लगेच तुम्ही तुमच्या जवळच्या पोलिस स्टेशनला जाऊन तक्रार करा.अथवा जर तुम्हाला तक्रार प्रत्यक्ष जाऊन करायची नसेल तर तुम्ही ही तक्रार ऑनलाईन देखील करू शकता. यासाठी १९३० या क्रमांकावर कॉल करून आपली तक्रार नोंदवा. व आपली झालेली लूट थांबवून गेलेले पैसे परत मिळवा.
महावितरण कार्यालय गाठत अधीक्षक अभियंत्यावर प्रश्नाचा भडिमार!
विद्यापीठाचा भोंगळ कारभाराने विद्यार्थी त्रस्त! गाऱ्हाणे ऐकायला एकही अधिकारी नाही
