रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल देश सोडवा लागेल म्हणत केले गंभीर आरोप.
news published by news24tas
कोकण :- शिवसेना विरुद्ध शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे गट हा वाद आता महाराष्ट्राला काही नवीन राहिलेला नाही परंतु या वादातून जे नवनवीन आरोप दोन्ही पक्ष एकमेकांवर करतात ते मात्र दिवसेंदिवस गंभीर होतांना आता दिसत आहे व आगामी महानगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर या आरोप प्रत्यारोपांचा अध्याय चालूच राहील असेच दिसत आहे. त्यामुळे मुंबई महानगर पालिकेत शिवसेना विरुद्ध शिवसेना असे सामने अनेक प्रभागात रंगतांना आगामी काळात दिसतील असेच चित्र सध्या तरी नेत्यांच्या भाषणांमधून दिसत आहे.
रामदास कदमांनी केले थेट उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप.
ज्यावेळी शिंदे साहेबांनी बंड करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी उद्धव ठाकरेंनी एकही आमदाराला निवडून येऊ देणार नाही अशी भाषा केली होती परंतु शिंदे साहेबांनी त्यावेळी मला सांगितले होते की आपल्या बरोबर आलेला एकही आमदार मी पडू देणार नाही व त्यांनी दिलेले शब्द खरे करत एकही आमदार पडू दिल नाही त्यामुळे ‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले’ अशा शब्दात एकनाथ शिंदे यांचे कौतुक करत रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्या वर गंभीर आरोप केले. व कदम पुढे म्हणले की, तुम्ही आम्हाला खोके खोके म्हणत दोघे बाप लेकं थकले पण जर आम्ही मी आणि एकनाथ शिंदे यांनी जर तोंड उघडले ना तर उद्धव ठाकरे यांना देश सोडून जावे लागेल. आम्ही अनेक खोके स्वतः मातोश्रीवर पोहचवले ते खोके आम्ही विकास कामासाठी दिले अशा शब्दात रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्या वर आरोप करत समाचार घेतला.ामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल देश सोडवा लागेल म्हणत केले गंभीर आरोप.
