जालन्यातील वाळूमाफियांची भाई गिरी !शेतकऱ्याला १० जणांनी मिळून अमानुषपणे केली मारहाण.
News published by News24tas
जालना:– जालन्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले असून याकडे पोलिस प्रशासन डोळे झाक करत असल्याचे दिसून येत आहे.अनेक वेळा अवैद्यरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांनी अधिकाऱ्यांच्या, तहसीलदारांच्या अंगावर गाड्या घालण्याचा प्रयत्न केलाय तर कधी प्राणघातक हल्ले.अनेक वेळा कारवाई होऊन देखील वाळू माफिया काही केल्या सुधारण्यास तयार नसून त्यांना कायद्याचा धाक नसल्याचेच वारंवार निदर्शनास येत आहे व अनेक ठिकाणी वाळू माफियांकडून हल्ल्याचे सत्र चालूच आहे.जालना येथील मांजरगावचे शेतकरी मदन आरसूड यांच्या वर देखील वाळू माफियांनी प्राणघातक हल्ला केला असून त्या हल्ल्यात त्याचा थोडक्यात जीव वाचल्याची माहिती उपस्थितांनी दिली यावेळी दिली.शेताला लागूनच नदी पात्र आल्यामुळे मदन यांनी अवैद्य पणे वाळू वाहतूक करणाऱ्या काही व्यक्तींना टोकले या छोट्याशा कारणावरून मदन याला १० जणांनी मिळून अमानुषपणे मारहाण करून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला आहे. जखमी मदन यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्या१० जणांवर एफ.आय.आर. दाखल केली असून अद्याप कोणालाही अटक केली नसायची माहिती आहे.
जखमी शेतकऱ्याची भेट घेत तत्काळ वाळू माफियांवर कारवाई करण्याची रवी राऊत यांची मागणी!
सदरील तरुणाला त्यांच्या नातेवाईकांनी जखमी अवस्थेत जालना सरकारी रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले असता याविषयी माहिती मिळताच तत्काळ मनसेचे जिल्हा अध्यक्ष रवी राऊत हे जिल्हा सामान्य रुग्णालयात जालना येथे दाखल झाले व त्यांनी मदन व त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली व विचारपूस केली. हल्ला करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी, कारवाई न झाल्यास योग्य त्या पद्धतीने भूमिका घेऊन याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन छेडू असा इशारा देत जखमी शेतकऱ्यांला१००% न्याय मिळवूनच देऊ असे देखील मनसेचे जिल्हा अध्यक्ष रवि राऊत यांनी यावेळी म्हणले. यावेळी लगेचच रवि राऊत यांनी संबंधित तपास पोलिस अधिकारी यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असता आरोपींना २ दिवसाच्या आत अटक करण्यात येईल अशी माहिती पोलिस अधिकारी यांनी मनसे जिल्हा अध्यक्ष रवी राऊत यांना दिली.सदरील भेटी दरम्यान मनसे जिल्हा उपाध्यक्ष शरद मांगदरे, बाळासाहेब काळे, योगेश कदम,वैभव साळे, संतोष शेळके,सोमनाथ कदम,जगदीश चौंडिये यांच्यासह मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जालन्यात धक्कादायक प्रकार उघडकीस! माणुसकीला काळिंबा फासणारी घटना उघडकी
विष्णू पाचफुले यांच्या प्रयत्नाला यश. आयुक्तांचे घरकुल भरण्याचे आदेश.
