जालन्यातील फायनान्स कंपनी ला मनसे चा इशारा.

नागरिकांना त्रास देणे थांबवा अन्यथा मनसे कार्यकर्ते फायनान्स वाल्यांना चोप देतील.

news published by news24tas 

जालना:- शहरातील विविध भागात फायनान्स कंपन्या आधी लोन देऊन नंतर बेकायदेशीरपणे वसुली करत असून सामान्य नागरिकांकडे गुंड प्रवृतीचे लोकं पाठवत आहे व कर्जाची वसुली करत आहेत.असा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव विलास तिकांडे यांनी फायनान्स कंपन्यांना सज्जड दम देत अशा प्रकारची वसुली तत्काळ बंद करावी अन्यथा आमच्याशी गाठ आहे असा इशारा दिला आहे.यावेळी बोलताना मनसेचे जिल्हा सचिव म्हणाले की,  कायद्यानुसार वसुली करण्यास आमचा विरोध नाही परंतु मार्च महिना जवळ येत असल्यामुळे जी बेकायदेशीरपणे वसुली चालू आहे व वसुली करतेवेळी जी असभ्य भाषा वापरून असभ्य वर्तन या कर्मचाऱ्यांकडून केले जाते ते तात्काळ थांबवा. अन्यथा आम्ही चोप देऊ असा इशारा त्यांनी बोलते वेळी  दिला.

फायनान्स

जालन्यात अनेक नागरिक फायनान्स कंपनीच्या त्रासाने त्रस्त.

जालना शहरातील अनेक नागरिक या विविध फायनान्स कंपन्यांच्या त्रासाला कंटाळले असून वारंवर या फायनान्स कंपन्या गुंड प्रवृतीचे लोकं पाठवून वसुली करतात.त्याचबरोबर कधी पण घरी येऊन असभ्य भाषा वापरतात तर कधी कधी रस्त्यातच धरून हफ्ते भरा असे म्हणतात. त्यामुळे या वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून अनेक जणांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे धाव घेतली असून मनसेच्या इशाऱ्यानंतर पुन्हा एकदा या नागरिकांची या त्रासातून सुटका होते का पाहावे लागेल.

मराठी बातम्या, मराठी न्यूज, महाराष्ट्र,मराठी जॉब, सरकारी भरती, मेगा भरती, goverment jobs, साठी जॉईन करा आमचे telegram चॅनल .

राज-उध्दव ठाकरे साहेब कोण होता तुम्ही कोण झालात तुम्ही !

 

पुणे येथील त्या बसस्थानकात शेकडो बलात्कार झाले असतील – मोरे

 

जालन्यातील फायनान्स कंपनी ला मनसे चा इशारा.

 

छावा बघून दिल्लीतले तरुण जागी झाले पण महाराष्ट्रातले मावळे का नाही?

 

https://news24tas.com/छावा-चित्रपट-पाहुन-विश्व/

news24tas
Author: news24tas

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संबंधित बातम्या