माजी.खा. इम्तियाज जलील यांची बुलढोजर कारवाईवर टीका.
News published by News24tas
संभाजीनगर:– राज्यात चालू असलेल्या औरंगजेबाच्या कबरीच्या वादावरून नागपुरात झालेल्या दंगलीत पोलिसांनी ५१ मुख्य आरोपींना अटक केली असून अन्य दोषींवर देखील कठोर कारवाई करत त्यांना अटक केली आहे. त्याचबरोबर नागपुरात दंगलीत सहभागी असलेल्या आरोपींच्या घरावर उत्तर प्रदेश सरकार प्रमाणे योगी पॅटर्न राबवत बुलढोजर चालवले व अनेक घरे तोडले त्यावर पत्रकारांनी विचारले असता खा. इम्तियाज जलील यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून अशा प्रकारे कारवाई करणे चुकीचे आहे असे म्हणले आहे.
त्या घरात राहणाऱ्या आई वडिलांचा व त्याच्या बायकोचा काय दोष – जलील.
पत्रकारांनी नागपूर हिंसाचारावर प्रश्न विचारले असता खा.जलील यांनी ही कारवाई चुकीची असून उत्तर प्रदेश सरकारने ज्या प्रकारे कारवाई केली.त्या प्रकारे नागपुरात कारवाई करण्यात आली असून ती चुकीची पद्धत आहे. यावर उत्तर प्रदेश सरकाराला देखील सुप्रीम कोर्टाने सुनावले होते व तोडलेले घरे सरकाने पुन्हा बांधून द्यावी अशी टिपणी देखील कोर्टाने केली होती असे मा.खा.जलील म्हणाले. त्याचबरोबर त्या घरात राहणाऱ्या आई वडिलांचा त्या कुटुंबाचा काय दोष म्हणता जलील यांनी आपल्या अनोख्या शैलीत एक शायरी देखील म्हणली की जिंदगीया उजड जाती है घर बनाने मैं ! तुम्हे शर्म नहीं आती बस्तिया उजाडणे मैं, जर अशाच प्रकारे कारवाई करायची असेल तर सरकारने कोर्टावर टाळे लावावे व सांगावे की आम्ही आमची कारवाई करू कोर्टाची काही गरज नाही. अशा शब्दात जलील यांनी आपल्या प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना व्यक्त केल्या.
शिवरायांच्या वाघ्या कुत्र्याची समाधि काढून टाका -संभाजी राजे.
