जालन्यातील दिव्यांगांचे प्रश्न लवकरच लागणार मार्गी.
News published by News24tas
जालना :– शहरातील दिव्यांगणांना राहण्यासाठी घर नसल्याने सकल दिवंगत सामाजिक संघटनच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू भाऊ पाचफुले यांच्याकडे निवेदनाव्दारे मागणी केली होती. शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू पाचफुले यांनी आयुक्त संतोष खांडेकर यांच्याकडे मागणी करत घरकुल देण्याची मागणी केली. व त्यानंतर लगेचच आयुक्त संतोष खांडेकर यांनी दिव्यांग विभागाला घरकुलचे अर्ज भरण्याचे आदेश दिले आहे.अनेक दिव्यांगानी घरकुलचे अर्ज भरण्याची सुरुवात झाली असून दिव्यांग घरकुलाचा प्रस्ताव आयुक्त संतोष खांडेकर यांच्याकडे दाखल करण्यात असल्याची माहिती दिव्यांग विभागाचे अधीक्षक रामेश्वर घोळवे यांनी दिली आहे शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू पाचफुले यांच्या प्रयत्नाला यश आले आहे.
अनेक आंदोलने व निवेदनानंतर अखेर दिव्यांगाच्या मागण्या होणार पूर्ण.
जालना शहरात अनेक दिवसापासून दिव्याग बांधव विविध मागण्यांसाठी आंदोलन करत असून यातील प्रमुख मागणी म्हणजे घरकुल योजनेची. सदरील मागणी लवकरच पूर्ण होणार असल्यामुळे सर्व दिव्यांग बांधव आनंदित झाले असून त्यांच्या आंदोलन यश मिळाले आहे.त्यामुळे येणाऱ्या काळात त्यांच्या इतर मागण्या देखील लवकरच प्रशासनाने मान्य कराव्यात अशी इच्छा आता दिव्यांग बांधव करत आहेत.
कडवंची गावात देखील ग्रामपंचायत कडून दिव्यांगांसाठी पाच टक्के निधी वाटप.
जालना तालुक्यातील नंदापूर येथे दिव्यांगांसाठी पाच टक्के वाटप झाल्या नसल्याने नंदापूर येथील दिव्यांगानी सकल दिव्यांग सामाजिक संघटने कडे मागणी केली होती त्या मागणीची दखल घेत सरपंच मिना संदीप क्षीरसागर ग्रामसेवक एम डी जेऊघाले यांच्याकडे दिव्यांगांसाठी पाच टक्के निधी वाटप करण्याची मागणी केली होती ग्रामपंचायत कार्यालय वरती सकल दिव्यांग सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पाच टक्के निधी वाटप करण्यात आलाय यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शंकर शिरगुळे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दिवंगत सेल जिल्हाध्यक्ष सतिश फतपुरे सरपंच मिना संदीप क्षीरसागर ग्रामपंचायतचे ग्रामसेवक एम डी जेऊघाले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विलास भावले आदींची उपस्थिती होती सकल दिवंगत सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नंदापूर ग्रामपंचायत येथील दिव्यांगांसाठी 50 टक्के घरपट्टी आणि 50% नळपट्टी माफ करा अशी मागणी सकलदिवन सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सरपंच संदीप क्षीरसागर यांच्याकडे केली आहे ग्रामपंचायत येथे बैठक घेऊन ठराव घेऊ असं आश्वासन सरपंच मिना संदीप क्षीरसागर यांनी दिले आहे.
वारंवार निवेदन देऊन व आंदोलने करून देखील मागण्या पूर्ण होईनात!
लवकरच जालना शहरात भगवान परशुराम यांचा पुतळा उभारू – आ.अर्जुन खोतकर.
