प्रताप सरनाईक यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा!
News published by News24tas
मुंबई:- गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक मुद्यावरून मराठी विरुद्ध हिंदी असा वाद चालू असल्याचे पहिला मिळाले होते. महाराष्ट्रात शालेय अभ्यासक्रमात हिंदी भाषा सक्तीचे देखील बोलले जात होते व त्यावरून जेव्हा राजकारण तापलं त्यानंतर सरकारने सदरील सक्ती मागे घेतली त्यामुळे मराठी विरुद्ध हिंदी वाद कुठे तरी शांत होताच प्रताप सरनाईक यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा नव्या वादाला सुरवात होण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे.पुन्हा या वक्तव्याने हिंदी भाषिक विरुद्ध मराठी भाषिक आमने सामने येण्याची स्थिती निर्माण झाली असून ऐन निवडणुकीच्या पूर्वी सदरील विषय निघत असल्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रामुख्याने मराठी विरुद्ध हिंदी वाद व मराठी अस्मिता या मुद्द्यांवर निवडणुका होतील असेच सध्याचे चित्र दिसत आहे.
प्रताप सरनाईक हिंदी भाषेवरून नेमके काय म्हणले?
हिंदी आता मुंबईची बोलीभाषा झाली आहे. हिंदी ही आमची लाडकी बहीण असल्याचं वक्तव्य राज्य परिवहनमंत्री प्रताप सरनाईकांनी केलंय. गेल्या काही दिवसांपूर्वी मराठी भाषेच्या वापरावरून राजकीय वातावरण तापलं होतं. हिंदी तर आता मुंबईची बोलीभाषा बनली आहे. आम्ही मराठीला मातृभाषा म्हणतो पण आमच्या तोंडी कधी हिंदी येते, कधी इंग्रजी येते. त्यामुळं हिंदीला आता बोलीभाषा बनली आहे. ठाणे व मिरा भाईंदर हा माझा मतदारसंघ आहे. जनतेशी बोलताना शुद्ध मराठीत बोलतो. जेंव्हा मिरा भाईंदर इथे जातो तेव्हा आपोआप तोंडातून हिंदी बाहेर पडते. आजकाल आपण मराठी आमची मातृभाषा आहे, आमची माय आहे असं म्हणतो. पण हिंदी आपली लाडकी बहीण आहे. कारण लाडक्या बहिणीमुळे आम्ही आज 237 च्या पुढे गेलो आहोत. असं परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं.
शिवसेना ठाकरे गट व मनसेच्या या वक्तव्यावर तीव्र शब्दात प्रतिक्रिया.
प्रताप सरनाईक यांच्या विधानानंतर मनसेचे यशवंत किल्लेदार यांनी संताप व्यक्त केला असून निव्वळ निवडणुकीच्या तोंडावर इतर भाषिकांना आकर्षित करण्यासाठी हे वक्तव केले असून मतांसाठी उद्या तुम्ही मराठीला व महाराष्ट्राला देखील गहन ठेवाल असे किल्लेदार म्हणाले तर दुसरीकडे शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली असून सरनाईक जे विचार मांडत आहेत ते अमित शहांचे व भारतीय जनता पक्षाचे असून सरनाईकांच्या तोंडी भाजपची भाषा आहे असे संजय राऊत म्हणाले.
राजकीय पार्श्वभूमीवर असलेल्या हुंडाबळी प्रकरणाची चर्चा,मात्र गरोदर पूजाला न्याय अजूनही का नाही?
महावितरण कार्यालय गाठत अधीक्षक अभियंत्यावर प्रश्नाचा भडिमार!
